राष्ट्रवादीला मोठा धक्का, युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ 4 जिल्हाध्यक्षांचा राजीनामा !

राष्ट्रवादीला मोठा धक्का, युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ 4 जिल्हाध्यक्षांचा राजीनामा !

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठा धक्का बसला आहे. मुंबईतील युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार जिल्हाध्यक्षांनी एकाचवेळी राजीनामा दिला आहे. दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष सुनील पालवे, ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष राजेंद्र थोरात, दक्षिण मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष रंगनाथन अय्यर आणि उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष अरुण मिश्रा यांनी राजीनामा दिला असून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे.

 

दरम्यान या चारही जिल्हाध्यक्षांनी जयंत पाटील यांना पत्र लिहिलं असून यामध्ये त्यांनी अनेक आरोप केले आहेत. वरिष्ठांकडून छळ केला जात असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

तसेच वेळोवेळी अपमानास्पद वागणूक दिली गेली. शिवाय त्यांच्या मनमानी कारभारामुळे आम्हाला अडचणीत आणण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मुंबईमधील वरिष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांसमोर आम्हाला खोटे पाडण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झाला. पण आम्ही कायम आमच्या पदाला न्याय दिला असल्याचंही त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.

मी सांगेल तेच काम करा, अन्यथा पदमुक्त करेन, अशी धमकीही मुंबई युवक राष्ट्रवादीच्या अध्यक्षांकडून देण्यात आली. असल्याचा आरोपर त्यांनी केला आहे.

 

COMMENTS