आझाद मैदानावर हल्लाबोल मोर्चा, शरद पवारांची सरकारवर टीका !

आझाद मैदानावर हल्लाबोल मोर्चा, शरद पवारांची सरकारवर टीका !

मुंबई – आझाद मैदानावर सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा हल्लाबोल मोर्चा सुरु आहे. या मोर्चादरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर जोरदार हल्ला केला आहे. महागाई शिगेला पोहोचली आहे, सुरू असलेले कारखाने बंद होतायत, रोजगार कमी होतायत, नवीन रोजगार मिळत नसल्याची टीका पवार यांनी केली आहे. तसेच समाजातील खालच्या वर्गावर अन्याय होत असून अच्छे दिनची घोषणा केली होती, मात्र आता लोक म्हणतातयत आम्हाला आमचे जुने दिवस द्या आणि आमची सुटका करा – पण हे काय सुटका करणार नाहीत त्यामुळे आता आपणच त्यांच्याकडून सुटका करून घ्यायची आहे.

दरम्यान हल्लाबोल यात्रा पूर्ण राज्यात फिरली आता पश्चिम महाराष्ट्र आ़णि कोकणातील हल्लाबोल यात्रा बाकी आहे. इथल्या लोकांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी आ़णि त्यांना आधार देण्यासाठी अधिवेशन संपले की त्या भागात हल्लाबोल यात्रा काढली जाईल असं पवार यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS