“शिवसेनेच्या उमेदवाराला अडीच लाख मतांनी निवडून दिले पण शेवटचे कधी बघितले हेच आठवत नाही !”

“शिवसेनेच्या उमेदवाराला अडीच लाख मतांनी निवडून दिले पण शेवटचे कधी बघितले हेच आठवत नाही !”

उस्मानाबाद – उस्मानाबादमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला अडीच लाख मताधिक्याने निवडून दिले. पण त्याला शेवटचे कधी बघितले हेच लोकांना आठवत नाही नसल्याची जोरदार टीका राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. राष्ट्रवादीच्या मराठवाड्यातील हल्लाबोल यात्रेचा आजचा दुसरा दिवस असून या यात्रेदरम्यान त्यांनी शिवसेना आणि भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे.

दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत तेही लोकांना माहीत नसल्याची टीका त्यांनी केली असून लोकांनी बटण दाबून ज्यांना निवडून दिले ते किती निष्क्रिय आहेत हे लोकांना आता कळू लागलं आहे. आता अन्याय सहन न करता याविरोधात आवाज उठवण्याची गरज असल्याचंही राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे.

COMMENTS