राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उचलला नांगर !

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उचलला नांगर !

जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सध्या उत्तर महाराष्ट्रात हल्लाबोल यात्रा सुरु आहे. या आंदोलनादरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. हल्लाबोल यात्रा आज जळगावातील धरणगाव याठिकाणी पोहचली असून यावेळी येथील सभेत जगाचा पोशिंदा बळीराजाच्या मेहनतीचे प्रतिक असलेले नांगर उचलून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभे असल्याचे सांगितले. त्यावेळी या नांगराचे पूजन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

https://twitter.com/NCPspeaks/status/966216399122325504

दरम्यान यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रयत्नांमुळे धरणगाव येथे उड्डाणपूल झालं असून राष्ट्रवादीच्या कारकीर्दीत सुरू झालेली कामे आज थांबली आहेत. सरकारला कामच करता येत नाही. या सरकारची परिस्थिती म्हणजे नाचता येईना अंगण वाकडं अशीच असल्याची टीका माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी केली आहे.

 

COMMENTS