उत्तर भारतीयांनी काम थांबवलं तर मुंबई बंद पडेल, संजय निरुपमांचं वक्तव्य, मनसेची पोस्टरबाजी !

उत्तर भारतीयांनी काम थांबवलं तर मुंबई बंद पडेल, संजय निरुपमांचं वक्तव्य, मनसेची पोस्टरबाजी !

नागपूर – उत्तर भारतीय मंडळी महाराष्ट्रातील सर्वच क्षेत्रात सक्रीय आहेत. हीच माणसं पूर्ण मुंबई चालवतात. त्यांनी जर ठरवलं तर सर्वकाही ठप्प होऊ शकतं. त्यामुळे त्यांना काम बंद करायला भाग पाडू नका, त्यांची जर काम थांबवलं तर मुंबई बंद पडेल असं वक्तव्य मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलं आहे. नागपुरातील एका कार्यक्रमात बोलत असताना निरुपम बोलत होते.

दरम्यान उत्तर भारतीय माणूस मुंबई आणि महाराष्ट्र चालवतो त्यांनी ठरवलं तर महाराष्ट्रही ठप्प होईल असंही निरुपम यांनी म्हटलं आहे. तसेच ‘उत्तर भारतातून महाराष्ट्रात आलेला माणूस सर्व कामं करतो. तुम्ही कोणतंही क्षेत्र सांगा. त्यामध्ये उत्तर भारतीय सक्रीय आहेत. उत्तर भारतीय माणूस रिक्षा-टॅक्सी चालवतो. फळं-भाजी विकतो. बांधकाम क्षेत्रातील बहुतांश मजूर हे उत्तर भारतीय आहेत. सर्व क्षेत्रांमध्ये उत्तर भारतीयांचं प्रमाण लक्षणीय आहे.तसेच जर फक्त एक दिवस उत्तर भारतीयांनी ठरवलं, तर मुंबईकारांना जेवायला मिळणार नसल्याचंही निरुपम यांनी म्हटलं आहे.

दरम्यान संजय निरुपम यांच्या वक्तव्यानंतर मनसेनं जोरदार टीका केली आहे. निरुमप  यांच्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पोस्टरबाजी केली आहे. निरुपम हे परप्रांतीय भटका कुत्रा असून, परप्रांतीय मतांवर डोळा ठेवून ते अशी विधाने करत आहेत, अशी पोस्टरबाजी मनसेकडून सोशल मीडियावर करण्यात येत आहे.

COMMENTS