‘मुख्यमंत्र्यांच्या धमकीला मी घाबरत नाही!’

‘मुख्यमंत्र्यांच्या धमकीला मी घाबरत नाही!’

नागपूर – राज्यभरातील विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं हल्लाबोल मोर्चा काढला. राष्ट्रवादीच्या या मोर्चावर टीका करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल आंदोलन करणाऱ्यांचे डल्लाबोल पुरावे आपल्याकडे आहेत असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांना दिला होता. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी समाचार घेतला आहे. अशा धमक्यांना मी घाबरत नाही त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या धमक्या देणं बंद करावं असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

तसेच मुख्यमंत्री गेल्या तीन वर्षांपासून फक्त धमकी देण्याचेच काम केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या तोंडी असली वक्तव्ये शोभून दिसत नाहीत. त्यांच्या धमकीला मी घाबरणारी नाही. त्यांनी अशा धमक्या देणे बंद करावे, अशा शब्दांत त्यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिले.

धमकी देण्यासाठी जो वेळ घालत आहात तो सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी दिला तर त्यांचं तरी भलं होईल, असा टोलाही त्यांनी लगावला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या तोंडी असले शब्द शोभून दिसत नाहीत. धमक्या देणे बंद करा असे सुनावत मी असल्या धमक्यांना घाबरत नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.

विरोधी पक्षात असताना शेतक-यांच्या आत्महत्यांबाबत फडणवीस हे सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर ३०२ गुन्हा दाखल करण्याची मागणी करत होते  आता ३०२ कलम कोणावर लावायचा, मुख्यमंत्री की उद्धव ठाकरे, यांच्यावर असा सवालही त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला.

 

COMMENTS