मंत्रीपदावरुन एनडीएत नाराजी, ‘हा’ पक्ष सरकारमधून बाहेर ?

मंत्रीपदावरुन एनडीएत नाराजी, ‘हा’ पक्ष सरकारमधून बाहेर ?

नवी दिल्ली – मंत्रीपदावरुन एनडीएत नाराजी असल्याचं पहावयास मिळत आहे. मंत्रीपदाची मागणी भाजपने फेटाळल्यामुळे बिहारमधील पक्ष जेडीयू सरकारमध्ये सहभागी होणार नाही. मोदी मंत्रीमंडळात दोन कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळेल, अशी जेडीयूला अपेक्षा होती. परंतु भाजपने ही मागणी फेटाळली आहे. त्यामुळे आम्ही सरकारमध्ये सहभागी होणार नसल्याची माहिती जेडीयू नेते बशिष्ठ नारायण सिंह यांनी दिली आहे. तसेच एनडीएमध्ये राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान आरसीपी सिंह आणि लल्लन सिंह यांना केंद्रीय मंत्री बनवलं जावं, अशी जेडीयू प्रमुख नितीश कुमार यांची मागणी होती. तर संतोष कुशवाह यांच्यासाठी राज्यमंत्रिपद मागितलं होतं. परंतु ही मागणी भाजपाने अमान्य केल्यामुळे जेडीयूनं सरकारमध्ये सहभागी होणार नसल्याचं म्हटलं आहे. मोदी मंत्रीमंडळात प्रत्येक मित्रपक्षाकडून एक एक मंत्री बनवला जाईल, असं बोललं जात आहे.

शिवसेनेकडून दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत शपथ घेणार आहेत. त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलंय. अकाली दलकडून हरसिमरत कौर पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. लोक जनशक्ती पक्षाकडून रामविलास पासवान, आरपीआयकडून रामदास आठवले, एआयडीएमकेकडून माजी मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांचे चिरंजीव रवींद्रनाथ आणि अपना दलकडून अनुप्रिया पटेल यांना मंत्रिपद देण्यात आलं असल्याची माहिती आहे.

परंतु जेडीयूनं मात्र तीन मंत्रीपदाची मागणी केली होती. ही मागणी भाजपने फेटाळली आहे. त्यामुळे मंत्रीपदावरुन एनडीएमध्ये नाराजी नाट्य सुरु झालं असल्याचं दिसत आहे.

COMMENTS