उस्मानाबाद – बॅलेट पेपर नीट न लावल्यामुळे मते वाया, 7 कर्मचारी निलंबित !

उस्मानाबाद – बॅलेट पेपर नीट न लावल्यामुळे मते वाया, 7 कर्मचारी निलंबित !

उस्मानाबाद – मतदान यंत्रावर बॅलेट पेपर नीट न लावल्यामुळे  उमेदवारांचे  मते वाया गेली आहे. कळंब तालुक्यातील गौर ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये मतदान यंत्रावर बॅलेट पेपर तिरका लावण्यात आला. त्यामुळे उमेदवारांच्या मतापेक्षा नोटाला मतदान जास्त झाले अाहे. काळजीपूर्वक तपासणी न करता मतदान प्रक्रिया पार पाडली याप्रकारामुळे मतदान केंद्रातील सात कर्मचारी निलंबित करण्यात आले आहे.

या निवडणुकीत प्रभाग क्र.3 चा निकाल राखीव ठेवण्यात आला असून येथे पुन्हा मतदान होईल. कळंब तालुक्यातील 30 गावांची निवडणूक सोमवारी पार पडली. निकालादरम्यान बॅलेट पेपर तिरका लावल्याचे समोर आल्यानंतर उमेदवार शोभा अवधूत यांनी तक्रार केली. याप्रकरणी सात कर्मचा-याचे निलंबन करण्यात आले आहे.

 

 

 

COMMENTS