पाशा पटेल यांची शरद पवारांवर जोरदार टीका !

पाशा पटेल यांची शरद पवारांवर जोरदार टीका !

पुणे – शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे शरद पवार यांचेच पाप असल्याचा आरोप कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केला आहे. शरद पवार हे देशाचे कृषी मंत्री होते तेव्हाही लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या असं पाशा पटेल यांनी म्हटलं आहे. तसेच शेतकरी स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे स्वयंपूर्ण झाला पाहिजे अशी भूमिका त्यावेळी शरद पवारांनी घेतली असती तर आज ही वेळ आलीच नसती असंही पाशा पटेल यांनी म्हटले आहे.

दरम्यान सध्या सुरु असलेल्या शेतक-यांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन टोकाची भूमिका घेण्याचे आवाहन शरद पवार यांनी शेतक-यांना केले आहे. अशा प्रकारची चिथावणी करणे योग्य नसल्याची भूमिका पाशा पटेल यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषेदत मांडली आहे.  यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका करत मागील २५ वर्षांपासून ज्यांनी सत्ता उपभोगली त्यांनी शेतकऱ्याची अवस्था अत्यंत वाईट केली आहे.तेव्हापासून शेतक-यांच्या आत्महत्या होत असल्याचा आरोप पाशा पटेल यांनी यावेळी केला आहे.

 

COMMENTS