‘या’ पक्षातील 40 आमदार भाजपच्या संपर्कात, पंतप्रधान मोदींचा गौप्यस्फोट !

‘या’ पक्षातील 40 आमदार भाजपच्या संपर्कात, पंतप्रधान मोदींचा गौप्यस्फोट !

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गौप्यस्फोट केला असून 40 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ममतादीदींचे ४० आमदार तृणमूल काँग्रेसला रामराम करून भाजपामध्ये प्रवेश करतील असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक आमदार तृणमूल काँग्रेस पक्षाला रामराम करतील. आजही ४० आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत. दीदी, तुमचं वाचणं कठीण आहे, कारण तुम्ही विश्वासघात केलाय, अशा शब्दात मोदींनी ममता बॅनर्जींवर हल्लाबोल केला.पश्चिम बंगालमधील सभेत ते बोलत होते. त्यांनी केलेल्या या दाव्यानंतर पश्चिम बंगालमधील राजकारणात खळबळ उडाली आहे.

दरम्यान अभिनेता अक्षय कुमारनं घेतलेल्या मुलाखतीत ममता दीदी दरवर्षी मिठाई पाठवतात असं मोदींनी म्हटलं होतं. त्यानंतर त्यांनी ममता बॅनर्जी  यांनी पंतप्रधानदींना दगड-माती पासून बनवलेले रसगुल्ले खाऊ घालायचे आहेत असं म्हणाल्या होत्या.  त्यावर मोदींनी प्रतिक्रिया दिली असून वाह.. माझे हे सौभाग्यच आहे. ज्या मातीवर रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, चैतन्य महाप्रभू, नेताजी सुभाष चंद्र बोस, श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्यासारख्या महापुराषांचा जन्म झालेल्या मातीतील रसगुल्ले म्हणजे माझ्यासाठी प्रसादच असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

COMMENTS