मावळता लाल तर उगवता सूर्य भगवा असतो –पंतप्रधान मोदी

मावळता लाल तर उगवता सूर्य भगवा असतो –पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली – मावळत्या सूर्याचा रंग लाल असतो तर उगवत्या सूर्याचा रंग भगवा असतो या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्रिपुरा आणि नागालँडमध्ये मिळालेल्या विजयाचे वर्णन केले आहे. ईशान्य भारतातील लोकांना असे वाटायचे कि, दिल्ली त्यांच्यापासून दूर आहे पण आज आम्ही अशी स्थिती निर्माण केली की, दिल्ली स्वत:हून चालत त्यांच्या दरवाज्याजवळ आली आहे असंही पंतप्रधान मोदी यांनी निवडणुकांच्या निकालानंतर म्हटलं आहे.

दरम्यान त्रिपुरामध्ये भाजपाचे जे उमेदवार निवडून आले आहेत ते सर्वात तरुण आहेत. आपल्या वयामुळे लोक आपल्याला नाकारतील अशी भिती त्यांच्या मनात होती परंतु या तरुण उमेदवारांनी लोकांचा विश्वास जिंकला असून लोकांनीही त्यांनी भरघोष मतांनी निवडून दिलं आहे. असं म्हणत मोदी यांनी त्रिपुरामध्ये निवडून आलेल्या उमेदवारांचे कौतुक केले. तसेच निवडणुकीतील जय-पराजय लोकशाहीचा भाग असून लोकशाहीचे ते सौंदर्य आहे. त्यामुळे पराभवालाही खिलाडूवृत्तीने स्वीकारले पाहिजे. असंही मोदी यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS