त्यामुळेच राहुल गांधींनी मला मिठी मारली – पंतप्रधान मोदी

त्यामुळेच राहुल गांधींनी मला मिठी मारली – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली – काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल लोकसभेमध्ये केलेलं जोरदार भाषण आणि पंतप्रधान मोदींना सभागृहातच मारलेली मिठी या दोन्ही बाबींवर देशभरात चर्चा सुरु आहे. याबाबत आज पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधींना टोला लगावला आहे. ‘आमच्या सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव का आणला याचं कारणच राहुल गांधींना सांगता येत नव्हतं. त्यांची गोची झाली होती. त्यामुळंच त्यांनी मला मिठी मारली असल्याचं वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे. शाहजहापूर याठिकाणी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

दरम्यान ‘आमच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव का आणला, असं आम्ही वारंवार विरोधकांना विचारत होतो. काहीतरी कारण द्या अशी विनवणी करत होतो. पण त्यांच्याकडं सांगण्यासारखं काहीच नव्हतं. अशा परिस्थितीत काय करायचं असा विचार करून राहुल गांधी माझ्या गळ्यात पडले असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे. ‘भ्रष्टाचार आणि घराणेशाहीच्या विरोधात आमचं सरकार लढत असल्यानंच आमच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला असल्याचा आरोपही यावेळी पंतप्रधान मोदींनी केला आहे.

COMMENTS