त्याशिवाय शांत बसणार नाही – प्रकाश आंबेडकर

त्याशिवाय शांत बसणार नाही – प्रकाश आंबेडकर

मुंबई – कोरेगाव भीमा येथील दंगलप्रकरणी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना अटक झाल्याशिवाय शांत बसणार नसल्याचं वक्तव्य भारिप बहूजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर गुरुवारी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी भिडे आणि एकबोटे यांना अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच राज्यात सरकारने सुरु केलेली दलित तरुणांची धरपकड थांबवावी अशी विनंतीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचं ते म्हणाले आहेत.

त्याचबरोबर बंद पुकारुन आम्ही दलित समाजाचा राग कैद करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, याप्रकरणी आरोपींवर तत्काळ कारवाई करुन सरकारने समाजाला विश्वास द्यावा. बंददरम्यान, हिंसाचार करणाऱ्यांची क्लिप जर पोलिसांकडे असेल तर त्यांनी ती आम्हाला सादर करावी या यादीतील लोकांना आम्ही हजर करु मात्र, पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन थांबावावे, त्याशिवाय आंदोलन नियंत्रणात राहणार नाही असंही आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS