“आताचे पंतप्रधान अटलजींच्या मार्गावर चालले तर चांगलं होईल”

“आताचे पंतप्रधान अटलजींच्या मार्गावर चालले तर चांगलं होईल”

‘अटल बिहारी वाजपेयी यांनी इंदिरा गांधी यांना दुर्गा म्हटलं होतं त्यामुळे आताचे पंतप्रधान नेहरूजीच्या, इंदिराजीच्या मार्गावर चालू शकत नाही मात्र अटलजींच्या मार्गावर चालले तर चांगलं होईल, असे वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी केलं.

राहुल गांधी काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत आता किती महिन्यात दिवसात ते काँग्रेसचे अध्यक्ष होतील हे माहीत नाही पण त्यांनी अध्यक्ष होणं गरजेच आहे.  असं मत जयराम रमेश यांनी व्यक्त केल.

जनता, काँग्रेस पार्टी इंदिरा गांधी यांची जन्मशताब्दी साजरी करत आहे पण सरकार नाही राजनैतिक मतभेद असावे पण व्यक्तिगत नको. असेही जयराम रमेश म्हणाले.

 

COMMENTS