लोकसभा निवडणूक लढवणार नाही, मोदीमुक्त भारत झालाच पाहिजे –  राज ठाकरे

लोकसभा निवडणूक लढवणार नाही, मोदीमुक्त भारत झालाच पाहिजे – राज ठाकरे

मुंबई – आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यापासून भारत मुक्त झाला पाहिजे असंही यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच मी कोणाकडे जागा मागयला गेलो नाही, मला लोकसभा निवडणूक लढवण्यात काहीही रस नाही. मोदींच्या विरोधात सगळ्यांनी एकत्र आलंच पाहिजे हे मी मागच्या गुढीपाडव्यालाच बोललो होतो. ही लोकसभा निवडणूक मोदी, शाह यांच्या विरोधात देश अशीच असणार आहे. असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. रंगशारदा येथील सभेत त्यांनी  भूमिका मांडली.

दरम्यान काँग्रेस, राष्ट्रवादी कोण? हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही. मोदीविरोध हीच माझी भूमिका आहे. जे काही करायचं आहे ते मोदी आणि भाजपाच्या विरोधात करायचं आहे असंही आवाहन मनसैनिकांना राज ठाकरेंनी केलं. नरेंद्र मोदी आणि अमित शाह नकोत,म्हणून भाजपाला मतदान करू नका असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. लोकसभेची लढाई ही कोणत्याही विशिष्ट पक्षाशी नाही.

COMMENTS