काँग्रेस स्वाभिमान गहाण ठेवून अपमान कधीपर्यंत सहन करणार? राम कदमांचा सवाल

काँग्रेस स्वाभिमान गहाण ठेवून अपमान कधीपर्यंत सहन करणार? राम कदमांचा सवाल

“आजच्या सामनाच्या अग्रलेखात देशातील विरोधी पक्षावर टीका करण्यात आली आहे. सध्याचा घडीला विरोधी पक्षातील नेते कमकुवत आहेत. केवळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सक्रिय आहेत आणि बाकीचे नेते निष्क्रिय झाले असल्याची टीका केली आहे. यावर महाराष्ट्रात काँग्रेसमुळे शिवसेना सत्तेत आहे. हीच शिवसेना जाहीरपणे काँग्रेसचे बडे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचा अपमान करत आहे. सत्तेच्या मोहापोटी काँग्रेसचे नेतेमंडळी स्वाभिमान गहाण ठेवून हा अपमान कधीपर्यंत सहन करणार?”, असा सवाल भाजपा नेते राम कदम यांनी केला आहे.

 

COMMENTS