रामदास कदम यांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर !

रामदास कदम यांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर !

मुंबई – पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी राज ठाकरे यांना प्लास्टिक बंदीवरुन प्रत्युत्तर दिलं आहे. काळं मांजर आडवं आलं तरी महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी होणार असल्याचं रामदास कदम यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान रामदास कदम यांच्यावर टीका करताना एखाद्याला आलेला झटका हे राज्याचं धोरण होऊ शकत नाही असं म्हटलं होतं. त्यानंतर रामदास कदम यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

दरम्यान राज ठाकरे यांना फक्त निवडणुका आणि पैसा दिसतो. काळं मांजर आडवं आलं तरी महाराष्ट्रात प्लास्टिकबंदी होणारच असल्याचं रामदास कदम यांनी म्हटलं आहे. रामदास कदम हे इवलिशी बुद्धी असलेले नेते आहे. माझा विषय सरकारशी संबंधित आहे नात्याशी संबंधित नाही. नात्यांशी हा विषय जोडू नये आणि नात्या नात्यांमध्ये वाद कसे होतील याची अपेक्षा ठेवू नये अशा शब्दात रामदास कदम यांच्या टीकेला राज ठाकरेंनी उत्तर दिले होते.

 

 

COMMENTS