अहमदनगरमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीचे प्रयत्न होते – रामदास कदम

अहमदनगरमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीचे प्रयत्न होते – रामदास कदम

मुंबई – अहमदनगर महापालिका निवडणुकीबाबत राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम  यांनी गौप्यस्फोट केला आहे. अहमदनगरमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीचे प्रयत्न होते असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे. तसेच महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा राष्ट्रवादी भाजपाबरोबर आहे यावर शिक्कामोर्तब झाले असल्याचंही कदम यांनी म्हटलं आहे.

दरम्यान या आघाडीसाठी मी स्वतः अजित पवार आणि विखे पाटील यांच्याशी बोललो होतो असेही रामदास कदम यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, असा आरोप रामदास कदम यांनी केला आहे. तसेच विधानसभा निवडणूक निकाल लागण्याआधी राष्ट्रवादीने भाजपला पाठींबा दिला आहे. आम्ही सत्तेतून बाहेर पडलो तर राष्ट्रवादी जागा घेईल अशी भीती आम्हाला वाटत असल्याचंही रामदास कदम यांनी म्हटलं आहे.

COMMENTS