राणेंचा मंत्रिमंडळात प्रवेश होणारच – गिरीष बापट

राणेंचा मंत्रिमंडळात प्रवेश होणारच – गिरीष बापट

नाशिक  – माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा मंत्रिमंडळ प्रवेश निश्चित आहे, असे वक्तव्य राज्याचे नागरी अन्न पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी केल. तसेच याचा  शिवसेना-भाजप युतीवर कोणताही परिणाम होणार नाही. युती मजबूत आहे आणि सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ निश्चित पूर्ण करेल, असा विश्वास गिरीष बापट यांनी व्यक्त केला. नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या मंत्री बापट यांनी येथे पत्रकारांशी संवाद साधला. 

यावेळी बापट म्हणाले, ‘भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंवर आरोप असले, तरी ते निर्दोष ठरतील. त्यानंतरच त्यांचा मंत्रिमंडळ प्रवेशाचा निर्णय होईल.’ कर्जमाफी योग्य शेतकऱ्यालाच मिळावी, यासाठी सरकार आग्रही असल्याने लाभार्थ्यांची यादी तपासण्याचे काम सुरू आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास उशीर होत असल्याचे मंत्री बापट यांनी सांगितले. शेतकरी संपाच्या काळात शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचा सरकार सकारात्मक विचार करत असल्याचे बापट यांनी सांगितले.

COMMENTS