पक्ष सोडून जाणाय्रा नेत्यांवर रोहित पवारांचा जोरदार टोला!

पक्ष सोडून जाणाय्रा नेत्यांवर रोहित पवारांचा जोरदार टोला!

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित यांनी शरद पवारांच्याच शैलीत पक्ष सोडून जाणाय्रा नेत्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘एखाद्या व्यक्तीच्या सोडून जाण्याने पक्ष संपत नसतो. यातूनच नवी भरारी घेता येते. तसंही भाकरी बदलण्याचा विचार करताना भरडं पीठ आपोआप बाजूला गेलेलं कधीही चांगलंच असतं, या शब्दांत रोहित पवार यांनी पक्ष सोडणाऱ्या नेत्यांना फेसबुक पोस्टद्वारे टोला लगावला आहे.

काय म्हणालेत रोहित पवार?

‘संधी आणि संधीसाधू या दोन शब्दात खूप मोठ्ठा फरक आहे. पक्षाने संधी दिली आणि ते संधीसाधू ठरले. आजही नेत्यांच्या नावापुढे राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या किंवा नेते असं लावलं जातं आणि त्यानंतरच त्यांची दखल घेतली जाते. हे त्यांना देखील माहित आहे. त्यामुळे प्रत्येकाने एक गोष्ट जरूर लक्षात ठेवावी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नसता तर आपणास आमंत्रण देण्यासाठी कोणीही आलं नसतं. तसंही पक्ष सोडून जाणाऱ्या लोकांची व्यक्तिगत कारणे असतील देखील पण एखाद्या व्यक्तीच्या पक्ष सोडून जाण्याने पक्ष संपत नसतो. यातूनच नवी भरारी घेता येते. तसंही भाकरी बदलण्याचा विचार करताना भरडं पीठ आपोआप बाजूला गेलेलं कधीही चांगलंच असतं.’

संधी आणि संधीसाधू या दोन शब्दात खूप मोठ्ठा फरक आहे. पक्षाने संधी दिली आणि ते संधीसाधू ठरले. आजही नेत्यांच्या नावापुढे…

Posted by Rohit Rajendra Pawar on Friday, July 26, 2019

COMMENTS