शिवसेना प्रमुख 50 वर्षांपूर्वी जे सांगत होते, ते आता काही लोकांना समजत आहे –संजय राऊत

शिवसेना प्रमुख 50 वर्षांपूर्वी जे सांगत होते, ते आता काही लोकांना समजत आहे –संजय राऊत

मुंबई – शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे ५० वर्षांपूर्वी जे सांगत होते, ते आता काही लोकांना समजत असल्याचं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. या देशात जातीवर नव्हे तर आर्थिक निकषावर आरक्षण दिले पाहिजे हे पन्नास वर्षांपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सांगत होते ते आज काही लोकांना समजत असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. ते शिवसेनेच्या नेत्या निलम गो-हे यांनी लिहिलेल्या ‘शिवसेनेतील माझी 20 वर्ष’ या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलत होते.

दरम्यान मुंबईवरील आक्रमणाबाबतही शिवसेनाप्रमुख सुरुवातीपासून सांगत होते ते लोकांना आता पटले आहे. असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान बुधवारी घेण्यात आलेल्या शरद पवारांच्या मुलाखतीत पवार यांनी आरक्षण हे आर्थिक निकषांवर दिलं पाहिजे असं म्हटलं होतं. त्यावर बोलत असताना राऊत यांनी शिवसेना प्रमुखांनी 50 वर्षांपूर्वी हे सांगितलं होतं ते आता काही लोकांना समजत असल्याचं म्हटलं आहे.

COMMENTS