नगरची जागा काँग्रेसला सोडली – शरद पवार

नगरची जागा काँग्रेसला सोडली – शरद पवार

पंढरपूर – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज माढा मतदारसंघाचा दौरा केला आहे. अकलूज याठिकाणी बोलत असताना पवारांनी नगरची जागा काँग्रेसला दिली असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी डॉ. सुजेय विखे यांचा मार्ग मोकळा झाला असल्याचं दिसत आहे.

दरम्यान माढ्याची बारामती करू असं मी बोललोच नाही. ते तुम्ही लोकांनी लिहलं. तुम्ही जनतेचे प्रतिनिधी म्हणून बोलला. मुख्यमंत्री भुजबळ यांना धमकवत आहेत. चांगल्या संस्कारातील गृहस्थ आहेत. पण त्याचे संस्कार दिसू लागले असल्याची टीकाही पवारांनी केली आहे. तसेच सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या आरोपाला उत्तरही यावेळी पवारांनी दिलं असून जर बोगस मतदान होऊन मी निवडून आलो तर दहा वर्षांनी का जागे झालात ? काही बोलायचं मंत्र्यांनी तारतम्य बाळगले पाहिजे असंही पवारांनी म्हटलं आहे.

तसेच यावेळी बोलत असताना पवारांनी पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. बालकोटमधील हल्ल्यात अतिरेकी ठार झाल्याचे सांगतात पण किती झाले सांगितले पाहिजे. देशातील जनतेच्या मनातील शंका दूर करण्याची मागणीही पवारांनी यावेळी केली आहे.

COMMENTS