शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, केली ‘ही’ प्रमुख मागणी !

शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, केली ‘ही’ प्रमुख मागणी !

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेतली. पवार यांनी कोल्हापूर आणि सांगलीतील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिलं आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच राज्य सरकारने सांगली कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना मदत करावी असा सल्ला शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. यावेळी राष्ट्रवादीतील प्रमुख नेते उपस्थित होते.

तसेच ‘न भुतो न भविष्यती‘ अशा महापुराच्या संकटातून ग्रामीण व शहरी जनतेला बाहेर काढण्यासाठी, त्यांच्या नुकसानाची योग्य भरपाई करण्यासाठी, बाधितांचे पुनर्वसन करण्यासाठी, मूलभूत सोयीसुविधा पुनर्स्थापित होण्यासाठी राज्य शासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करावेत, अशी विनंतीही पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. तसेच पूरग्रस्तांना जाहीर केलेल्या मदतीमध्ये सरकारने वाढ करावी अशी मागणीही पवारांनी केली आहे.

COMMENTS