बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीबाबत शरद पवारांचं मोठ वक्तव्य !

बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीबाबत शरद पवारांचं मोठ वक्तव्य !

मुंबई – बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठ वक्तव्य केलं आहे. बारामतीची जागा जिंकण्याचा भाजप सातत्याने दावा करत आहे. ईव्हीएम छेडछाडीच्या आधारे तर भाजपकडून असा दावा करण्यात येत नाही ना? अशी शंका शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपच्या नेत्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपचाच विजय होणार असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे शरद पवार यांनी आता शंका उपस्थित केली आहे. देशभरात ईव्हीएमबाबत अनेकदा शंका व्यक्त करण्यात आल्या आहेत. कधीही निवडणूक न लढवणारे चंद्रकांत पाटील यांच्यासारखे नेते इतक्या आत्मविश्वासाने बारामतीची जागा जिंकण्याचा दावा करत आहेत. हा दावा ईव्हीएमच्या जोरावर तर केला जात नाही ना? असा सवाल पवारांनी केला आहे.

 

COMMENTS