शेतकरी कायद्यासंदर्भात प्रश्न विचारल्याने पवार संतापले

शेतकरी कायद्यासंदर्भात प्रश्न विचारल्याने पवार संतापले

नवी दिल्ली – शरद पवार आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यात दिल्लीत बैठक पार पडली.  दोघांमध्ये साधारणतः अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. कृषी कायद्यासंदर्भात चर्चा झाल्याशिवाय त्याबाबत काहीही भाष्य करणार नसल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं. मात्र पत्रकारांनी वारंवार पत्र आणि शेतकरी आंदोलनाबद्दल प्रश्न विचारल्याने शरद पवार संतापले आणि पत्रकार परिषद संपवून निघून गेले.

केंद्राच्या शेतकरी कायद्याच्या विरोधात भाजप विरोधी आघाडीने भारत बंदची घोषणा केली आहे. यावर महाविकास आघाडी सरकारच्या भाजप नेत्यांची भूमिका दुटप्पी असल्याची टीका विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच २०१० साली तत्कालीन कृषी मंत्री शरद पवार यांनी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचे वाचन करून या कायद्याची शिफारस त्यांनीच केली असल्याचा दावा फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केला होता. याबाबत शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधून स्पष्टीकरण केले.

त्यावेळी शरद पवार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना लिहिलेले ते पत्र कृषी कायद्यांमधील सुधारणांसंदर्भात लिहिलेलं होतं. तसेच त्या पत्रावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी ते पत्र बारकाईनं वाचायला हवं होतं, असं वक्तव्यही त्यांनी केलं आहे. शरद पवार यांनी यावेळी विषय भरकटवण्यासाठी हे केलं जात असल्याचाही आरोप केला. याला जास्त महत्व देऊ नका असंही ते म्हणाले आहेत.

 

COMMENTS