शिरूरमध्ये कोण जिंकणार?, रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा अंदाज !

शिरूरमध्ये कोण जिंकणार?, रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा अंदाज !

पुणे – राज्यात लोकसभा निवडणूक चांगलीच गाजली आहे. 48 जागांपैकी काही महत्त्वाच्या जागांवर अत्यंत चुरशीची निवडणूक झाली आहे. त्यापैकीच शिरुर हा एक मतदारसंघ होय. या मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील तर राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे हे आमनेसामने आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांपैकी कोण निवडणूक जिंकणार याची उत्सुकता राज्याला लागली आहे. या मतदारसंघगाचा अंदाज रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मांडला आहे.  प्रशांत किशोर यांच्या म्हणण्यानुसार 90 हजार ते एक लाख मतांनी आपण निवडून येणार असल्याचा दावा आढळराव पाटील यांनी केला आहे.

दरम्यान प्रशांत किशोर यांच्या टीमने तब्बल एक लाख लोकांचा सर्व्हे केला असून  त्यातून हा निष्कर्ष आल्याचा दावा आढळराव पाटील यांनी केला आहे. तसेच आढळराव पाटील यांनी यासाठी कोणताही कागदी पुरावा दिला नसला तरी प्रशांत किशोर यांनी थेट सांगितल्याचा दावा केला आहे. आढळराव पाटील त्यांच्या विजयावर ठाम आहेत. तर अमोल कोल्हे यांच्याकडूनही विजयाचा दावा केला जातोय. त्यामुळे 23 मे रोजी याठिराणचं चित्र स्पष्ट होणार आहे.

COMMENTS