…तर आम्ही भाजपसोबत जाऊ – मनोहर जोशी

…तर आम्ही भाजपसोबत जाऊ – मनोहर जोशी

मुंबई – राम मंदिरावरुन मतांचे राजकारण होता कामा नये, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जर एकत्र येणार असेल तर आम्ही भाजपसोबत जाऊ असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि शिवेसनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी केलं आहे. तसेच हिंदूंनी एकत्र यावे हा आमचा उद्देश स्पष्ट आहे. याद्वारे हिंदुस्तानाचे नाव सार्थ व्हावे असं आम्हाला वाटत असल्याचंही यावेळी मनोहर जोशी यांनी म्हटलं आहे. शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे अयोध्येकडे रवाना झाले आहेत. त्यापूर्वी शुभेच्छा देण्यासाठी मनोहर जोशी यांनी मातोश्रीवर जाऊन त्यांची भेट घेतली.

दरम्यान आज ठाकरे कुटुंबीय चांगल्या कामासाठी बाहेर पडले आहेत, त्यांना यश मिळो हीच प्रभू रामचंद्राकडे आमची प्रार्थना आहे. त्यांचा प्रवास सुखरूप व्हावा. मी १९९२ मध्ये अयोध्येला गेलो होते, तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनीही मला सेनाभवनातून असाच निरोप दिला होता. उद्धव ठाकरे चांगलं पाऊल टाकत आहेत ते यात नक्कीच यशस्वी होतील असा विश्वासही यावेळी मनोहर जोशी यांनी व्यक्त केला आहे.

 

COMMENTS