“शिवसेनेला सत्तेतून बाहेर पडण्याचा सल्ला, भाजप हिटलिस्टवर !”

“शिवसेनेला सत्तेतून बाहेर पडण्याचा सल्ला, भाजप हिटलिस्टवर !”

जालना – शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावे, भाजप हिटलिस्टवर आहे, असा व्यक्तिगत सल्ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. यावर्षीचा अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांसाठी उसाच्या पाकात गाजर बुडवून दिल्याप्रमाणे आहे. अर्थसंकल्पात केवळ शोषण करण्यात आलं असून रब्बी हंगामात शेती खर्चाच्या दीडपट हमीभाव देऊन अशी घोषणा अर्थ संकल्पात करण्यात आली आहे, मात्र शासन शेतीमालाला भाव देत नाही, सध्या तुरीच्या हमीभावापेक्षा कमी भावाने खरेदी होत असल्याचंही राजू शेट्टी यांनी म्टलं आहे.

भाजपनी अच्छे दिनाचे गाजर दाखवून फसवणूक केली असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना ही शेतकऱ्यांच्या हितासाठी राजकारण करते त्यामुळं भाजप हिटलिस्टवर असून शिवसेना शेतकऱ्यांच्या बाजूने भूमिका घेते. त्यामुळं शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावं हे आपलं व्यक्तिगत मत आहे,  असे ही ते म्हणाले.तसेच 2019 च्या निवडणुकांमध्ये कोणासोबत जायचे की नाही याबाबत अद्याप कोणतीही चर्चा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत झाली नाही, त्यामुळे सध्या तरी आम्ही एकटे आहोत, असंही राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS