हा गृहखात्याचा पराभव आहे, शिवसेनेची मुख्यमंत्र्यांवर टीका!

हा गृहखात्याचा पराभव आहे, शिवसेनेची मुख्यमंत्र्यांवर टीका!

मुंबई – २०१४ पासून पोलिंसावरील हल्ल्यांमध्ये वाढ झाली असून हा गृहखात्याचा पराभव असल्याची टीका शिवसेनेनं केली आहे. तसेच असेच चित्र राहिल्यास राज्याचा डोलारा कोसळायला वेळ लागणार नाही, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. राज्यात पोलीस सुरक्षित नसतील तर जनता सुरक्षित कशी राहील, असा सवालही उपस्थित केला आहे. राज्यकर्त्यांच्या दृष्टीने कायदा आणि सुव्यवस्था नेहमीच उत्तम असते. पण राज्यात पोलिसांवरील हल्ल्यांत प्रचंड वाढ झाली आहे. पोलीस ठिकठिकाणी मार खात आहेत. अशी टीका शिवसेनेनं सामनातून तेली आहे.

दरम्यान दारू तस्कराने चंद्रपूर जिह्यातील नागभीड पोलीस ठाण्याचे फौजदार छत्रपती चिडे यांच्या अंगावर वाहन चढवून चिरडून मारले. चिडे यांची हत्या दारू तस्करीच्या वादातून झाली व त्यास सर्वस्वी सरकार जबाबदार आहे. तसेच गेल्या चार वर्षांत पेलिसांना मोठय़ाप्रमाणात प्राण गमवावे लागले व पोलिसांवरील सर्वाधिक हल्ले हे विदर्भात झाल्याच्या नोंद आहे. सीआयडीने प्रसिद्ध केलेली आकडेवारी चिंताजनक आहे. राज्यात पोलीस सुरक्षित नाहीत व काश्मीरात ज्याप्रमाणे पोलीस व सुरक्षा दलांवर हल्ले होत आहेत तसे प्रकार महाराष्ट्रात वाढले असल्याचंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

तसेच सीआयडीच्या 2016 च्या गुन्हे अहवालानुसार 2015 मध्ये साधारण 370 पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ले झाले. 2016 मध्ये 428 पोलिसांवर हल्ले झाले. त्यात 56 पोलिसांना मरण पत्करावे लागले. सर्वाधिक पोलीस बळी चंद्रपुरात (11) गेले व त्यासाठी लादलेली दारूबंदी व दारू तस्करी हे मुख्य कारण असल्याचंही शिवसेनेनं सामनातून म्हटलं आहे.

COMMENTS