“रावसाहेब दानवेंना लाज, शरम कशी वाटत नाही?”

“रावसाहेब दानवेंना लाज, शरम कशी वाटत नाही?”

कोल्हापूर – शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आहे. अहमदनगर जिल्ह्यात शेतक-यांवर झालेल्या गोळीबारावरुन दानवेंनी केलेल्या वक्तव्याचा ठाकरे यांनी समाचार घेतला आहे. असं वक्तव्य करतना रावसाहेब दानवे यांना लाज, शरम कशी वाटत नाही या शब्दात त्यांनी दानवेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

ऊसदरासाठी आंदोलन करणा-या शेतक-यांवर पोलिसांनी गोळीबार केला होता. त्यावेळी पोलिसांनी शेतक-यांच्या अंगावर नाहीतर पायावर गोळीबार करायला हवा होता असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं होतं. त्यावरुन दानवे यांच्यावर चौफर टीका झाली होती. त्याचाच संदर्भ घेत ठाकरे यांनी दानवे यांना खडसावलं आहे. ज्यांनी तुम्हाला निवडूण दिलं त्याच्यावरच तुम्ही गोळ्या चालवत आहात असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

COMMENTS