वरुन द्या, खालून द्या, ज्या द्यायचे त्याला द्या – फडणवीस

मुंबई – राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, राज ठाकरे यांच्यासह राज्यातील अनेक नेत्यांचे पोलीस संरक्षण कमी केले. त्यावर आरोप प्रत्यारोप केले जात असताना आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत वरुन द्या, खालून द्या, ज्या द्यायचे त्याला सरंक्षण द्या, आमच्यावर काहीच फरक पडणार नाही. ते लोणावळा येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

फडणवीस म्हणाले, “सुरक्षा काढणं किंवा ठेवणं यामुळे आमच्यावर काही परिणाम होत नाही. त्यामुळे आम्हाला त्याची काही चिंता नाही. आम्ही सुरक्षेशिवाय फिरणारे लोकं आहोत. आहे तेवढी सुरक्षा पुरेसी आहे व ती ठेवली नाही तरी देखील आम्हाला काही अडचण नाही.”

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, “मी वर्षानुवर्षे अगदी प्रदेशाध्यक्ष असतानाही एक साधा सुरक्षा रक्षक माझ्याजवळ नव्हता. मी गडचिरोलीला जायचो, सिरोंच्याला देखील जायचो, सगळीकडे जायचो. आज देखील मला एकही सुरक्षा रक्षक दिला नाही तरी मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरू शकतो. त्यामुळे आमची त्यावर कुठलीही तक्रार नाही, आक्षेप नाही. काल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं, की जे काही आमचे सुरक्षा रक्षक काढले आहेत. त्यांचा वापर तुम्ही महिलांच्या सुरक्षिततेसाठी करा. या सर्व गोष्टींवर लक्ष केंद्रीत करायच्या ऐवजी जरा भंडारा सारख्या घटेनवर अधिक लक्ष सरकारने केंद्रीत केलं पाहिजे.”

COMMENTS