‘नाफेड’कडून 15 एप्रिलनंतर तूर खरेदी बंद!

‘नाफेड’कडून 15 एप्रिलनंतर तूर खरेदी बंद!

अकोला – ‘नाफेड’ने 15 एप्रिलनंतर कोणत्याही प्रकारची तूर खरेदी करणार नाही, अशा आशयाचे पत्र जारी केले आहे. 16 एप्रिलपासून तूर खरेदीची कोणतीच जबाबदारी आपली राहणार नाही, असेही नाफेडने पत्रात स्पष्ट केले आहे.

बारदाना उपलब्ध नसल्याने अगोदर पासूनच तुरीची खरेदी रखडली आहे. त्यातच आता नाफेडने आपली जबाबदारी झटकल्याने शेतकऱ्यांनी कुणाकडे पाहायचे हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या फक्त अर्ध्या तूरीची विक्री झाली आहे. अजूनही अर्धी तूर शेतकऱ्यांकडे पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सरकारकडून नाफेडच्या या पत्रावर अद्याप कोणतेही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र काही दिवसांपूर्वीच झालेल्या बैठकीत कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी नाफेडला तातडीने बारदाना उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले होते. मात्र नाफेडच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या काळजीत भर पडली आहे.

COMMENTS