अरविंद केजरीवाल यांनी आमच्या विजयाचे श्रेय ईव्हीएमला देऊ नयेत   – अमित शहा

अरविंद केजरीवाल यांनी आमच्या विजयाचे श्रेय ईव्हीएमला देऊ नयेत – अमित शहा

“दिल्लीतील जनादेश हा देशाचा जनादेश आहे. यामुळे पुन्हा एकदा देशाचे नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ठामपणे उभे असल्याचे दिसून आले आहे. केजरीवालजींनी आमच्या विजयाचे श्रेय ईव्हीएमला देऊ नये. त्यांना खरे कारण जाणून घ्यायचे असेल तर त्यांनी आमच्या मतदान केंद्र प्रमुखाची भेट घ्यावी.’असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले आहे.

अमित शहा आज (मंगळवार) भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि नवनियुक्त नगरसेवकांना संबोधित करत होते. त्यावेळी ते बोलत होते.

भाजपने दिल्लीतील तीन महानगरपालिकांमधील एकूण 272 जागांपैकी तब्बल 181 जागेंवर कमळ फुलवले आहे. तर फक्त 47 जागांवरच आम आदमी पक्षाला समाधान मानावे लागले. आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली महापालिकेत पराभव झाल्यानंतर अपयशाचं खापर ईव्हीएम मशीनवर फोडले होते. ईव्हीएम मशिनमुळेच भाजपचा विजय झाल्याचा केजरीवाल यांनी आरोप ही केला होता.

केजरीवाल यांनी सुरुवातीला ईव्हीएमला दोष दिला. मात्र त्यानंतर पक्षाचे कार्यकर्ते आणि मतदारांना भेटल्यानंतर चूक झाल्याचे मान्य केले आहे. आत्मपरीक्षण करून चुका सुधारू, असेही त्यांनी जाहीर केले.

 

COMMENTS