आणेवाडी टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना काढल्यास याद राखा –  उदयनराजे भोसले

आणेवाडी टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना काढल्यास याद राखा – उदयनराजे भोसले

सातारा- राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आणेवाडी टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना काढलं तर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. व्यवस्थापनाला या प्रश्नावर त्यांनी चांगलंच सुनावले आहे.

सध्या असलेल्या व्यवस्थापनाकडून दुसऱ्या व्यवस्थापनाकडे हा टोल नाका जाणार आहे. त्यामुळे 1 ऑक्टोबरपासून या टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना काढून नवी भरती होणार आहे. याला सध्याच्या टोल कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळेच खासदार उदयनराजेंनी टोल कर्मचाऱ्यांची बाजू घेऊन, टोल प्रशासनाला चांगलेच सुनावले. थेट उदयनराजे टोलनाक्यावर आल्याने, सातारा-पुणे महामार्गावर त्यांना पाहण्यासाठी गर्दी झाली होती.

COMMENTS