…..आता दोन जवानांच्या बदल्यात पाकिस्तान्यांच्या किती जणांची मुंडकी आणणार ?

…..आता दोन जवानांच्या बदल्यात पाकिस्तान्यांच्या किती जणांची मुंडकी आणणार ?

 

 

पाकिस्तानच्या सैन्यानं भारताच्या हद्दीत घुसून पुन्हा कुरातपत काढली आहे. पाकिस्तानी जवानांनी केलेल्या हल्ल्यात भारताचे दोन जवान शहीद झाले. एवढचं नाही तर पाकिस्तानी जवानांनी भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना केली. यावर देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. विरोधी पक्षांनीही सरकारला यावरुन खडे बोल सुनावले आहे. विरोधात असताना मोठ्या मोठ्या बाता मारणा-या पंतप्रधांनाची 56 इंचाची छाती कुठे गेली असा सवाल उपस्थित केला जात आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते कपील सिब्ल यांनी यावरुन सरकारवर प्रहार केलाय. 2013 मध्ये एका भारतीय जवानांची अशीच हत्या पाकिस्तानी सैन्याने केली होती. त्यावेळी विरोधी पक्षात असललेल्या सुषमा स्वराज यांनी भारताच्या एका जवानाच्या बदल्यात पाकिस्तानची 10 मुंडकी भारतात आणायला पाहिजे असं वक्तव्य केलं होतं. त्यावरुन आता दोन जवानांच्या बदल्यात पाकिस्तानची किती मुंडकी आणणार असा सवाल सिब्बल यांनी केलाय.

युपीएच्या काळात अशीच एका जवानाची हत्या झाली होती. त्यावेळी स्मृती इराणी यांनी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना बांगड्या द्यायला हव्यात असं वक्तव्य केलं होतं. आता मोदींनी कुणी बांगड्या पाठवायच्या असा सवालही सिब्बल यांनी केलाय.

COMMENTS