आता मुंबईच्या नगरसेवकांनाही हवी आहे राज्यभरात टोलमाफी

आता मुंबईच्या नगरसेवकांनाही हवी आहे राज्यभरात टोलमाफी

मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना सुद्धा आमदार आणि खासदारांप्रमाणे राज्यभर टोल माफ पाहिजे आहे.  वरळी सी-लिंकवर टोलमाफी दिल्यानंतर आता मुंबईच्या नगरसेवकांना राज्यातील सर्वच टोलवरून विनामूल्य प्रवास हवा आहे. खासदार आणि आमदार यांना ज्याप्रमाणे सर्व टोल नाक्यांवर विनामूल्य प्रवासाची मुभा असते. त्याचप्रमाणे नगरसेवकांनाही राज्यातील सर्वच टोल नाक्यांवर टोलमाफी देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. घाटकोपरचे नगरसेवक तुकाराम पाटील यांची ठरावाची सूचना पालिका सभागृहात पास झाली असून हा प्रस्ताव आता मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे.

यापूर्वीच नगरसेवकांचे मानधन पाचपट वाढविण्याची मागणी सपा गटनेते रईस शेख यांनी केली आहे. त्यानंतर आता राज्यभरात टोलमाफीची मागणी करण्यात येत आहे.

 

 

COMMENTS