उद्धव-रश्मी ठाकरेंचं राणेंकडून स्वागत, तर देवेंद्र सरकारचं केलं तोंडभरुन कौतुक

उद्धव-रश्मी ठाकरेंचं राणेंकडून स्वागत, तर देवेंद्र सरकारचं केलं तोंडभरुन कौतुक

उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे दिग्गज नेते नारायण राणे एकाच मंचावर तब्बल 12 वर्षांनी एकत्र आले, निमीत्य  होत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ इथे मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण भूमिपूजनचा कार्यक्रम… नारायण राणे यांनी भाषणाला सुरूवात करताच राणे समर्थकांनी घोषणाबाजी केली…  राणेंनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची स्तुती केली. त्यामुळे राणे भाजपच्या वाटेवर आहेत का, असा सवाल उपस्थित झाला. विशेष म्हणजे नारायण राणेंनी उद्धव आणि रश्मी ठाकरेंच्या यांचं स्वागत केलं. यांच्या नावाचा उल्लेख करताच शिवसैनिकांनीही जोरदार घोषणाबाजी केली.  मात्र राणे एवढ्यावरच थांबले नाहीत तर कार्यक्रमात त्यांनी थेट नरेंद्र आणि देवेंद्र सरकारचं तोंडभरुन कौतुक केलं.

राज्यात देवेंद्र आणि केंद्रात नरेन्द्र विकासासाठी प्रयत्न करत आहेत. विकासाच्या आड राजकारण येता कामा नये. जिथे विकास आहे, तिथे पक्षीय राजकारण करु नये, असं यावेळी नारायण राणे म्हणाले. नितीन गडकरी विकासपुरुष आहे. विकास आणि राजकारण यात भावना आड यायला नकोत, असंही राणे म्हणाले.

COMMENTS