कर्जमाफी हवी असेल तर मंत्र्यांचे राजीनामे देऊन संघर्ष यात्रेत सहभागी व्हा; राधाकृष्ण विखे पाटील यांचे उद्धव ठाकरेंना आवाहन

कर्जमाफी हवी असेल तर मंत्र्यांचे राजीनामे देऊन संघर्ष यात्रेत सहभागी व्हा; राधाकृष्ण विखे पाटील यांचे उद्धव ठाकरेंना आवाहन

जालना: कर्जमाफी हवी असेल तर मंत्र्यांचे राजीनामे देऊन संघर्ष यात्रेत सहभागी व्हा, असे खुलं आवाहन   काँग्रेसचे विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना केले आहे.

 

सत्तेत येऊनही देशाच्या पंतप्रधानांना शेतकऱ्यांचं दुःख कळालेलं नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी अशी तुमची भावना असेल तर सत्तेतून बाहेर पडून संघर्ष यात्रेत सहभागी व्हा, असं आवाहन विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटिल यांनी केलय.

 

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वतीने काढण्यात आलेली शेतकरी संघर्ष यात्रा आज जालन्यात पोहचल्यानंतर घेण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते, आज एक एप्रिल फूल असल्याचं लक्षात आल्यानंतर आजचा दिवस हा मोदींचा दिवस असल्याचं सांगत सर्वात फेकाफेकीचा दिवस असल्याचं देखील राधाकृष्ण विखे म्हणाले.

COMMENTS