काँग्रेसमोर अस्तित्वाची लढाई, जयराम रमेश यांचा इशारा

काँग्रेसमोर अस्तित्वाची लढाई, जयराम रमेश यांचा इशारा

कोच्ची – सध्याची परिस्थिती काँग्रेससाठी अत्यंत बिकट असून पक्षाच्या अस्तित्वाची लढाई असल्याचं सांगत काँग्रेसच्या नेत्यांना घरचा आहेर दिला आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा किंवा भाजप काही चुका करतील त्यातून सरकारविरोधात वातावरण तयार होईल आणि पुन्हा आपण सत्तेत येऊ अशा भ्रमात काँग्रेसने राहू नये असा इशाराही जयराम रमेश यांनी दिला आहे.

आणिबाणीनंतरही आणि त्यानंतर 1996 ते 2004 पर्य़ंत काँग्रेसची अशीच अवस्था होती. मात्र दोन्ही वेळेस काँग्रेस पक्ष त्यातून बाहेर पडला. आता मात्र परिस्थिती काहीशी वेगळी आहे. आता पक्षाच्या अस्तित्वाची लढाई आहे. त्यासाठी सर्व काँग्रेसच्या नेत्यांनी एकजुटीने पुढे येण्याची गरज असल्याचं सांगितलं.

केवळ सरकार चुकेल आणि आपल्याला संधी मिळेल या भ्रमात न राहता पक्षाने विविध रणनिती वापरून आक्रमकपणे सराविरोधात लढायला हवे असंही रमेश म्हणाले.

COMMENTS