केंद्रात जाण्याची तूर्तास कोणतीही शक्यता नाही – मुख्यमंत्री

केंद्रात जाण्याची तूर्तास कोणतीही शक्यता नाही – मुख्यमंत्री

मुंबई – आपण केंद्रात जाण्याची तूर्तास शक्यता नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रातील शक्यतेला पूर्णविराम दिला. तसेच भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदावर रावसाहेब दानवे हेच असतील, असेही ते म्हणाले. मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यकारिणींच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिले.

 

ते म्हणाले की, रावसाहेब दानवे यांना भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांच्या नेतृत्त्वात आम्ही भविष्यातही निवडणुका लढवू, अशा शब्दांत त्यांनी स्पष्टीकरण दिले. त्यामुळे दानवे हेच प्रदेशाध्यक्ष पदावर राहतील हे स्पष्ट झाले आहे. सरकार चांगले निर्णय घेते, मात्र ते खालपर्यत पोहचवले जात नाही, ते काम करणे गरजेचे आहे. मी मीडियाला दोष देणार नाही. आपल्याबाबत काही दाखवले नाही तर त्यांची दुकानदारी चालणार नाही.

 

COMMENTS