कोपर्डी घटनेप्रकरणी सरकारला गांभीर्य नाही – अजित  पवार

कोपर्डी घटनेप्रकरणी सरकारला गांभीर्य नाही – अजित पवार

जळगाव – कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, फास्ट ट्रक कोर्टात हा खटला चालविण्याचे आश्वासन सरकारने दिल होते तेही पाळले गेले नाही यासह अन्य मागण्यांसाठी आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला.

घटनेला एक वर्षे उलटूनही सरकार कडून काहीच हालचाल नाही. सरकार कोपर्डी घटनेप्रकरणी गंभीर नाही असा आरोप यावेळी अजित पवारांनी केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयापासून हा पायी मूक मोर्चा निघाला.

यावेळी माजी मंत्री सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, आमदार सतीश पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

COMMENTS