खडसेंचा सरकारवर पुन्हा हल्लाबोल

खडसेंचा सरकारवर पुन्हा हल्लाबोल

मुंबई – खान्देशातील महत्त्वाचे मंजुर प्रकल्प कोणतेही कारण न देता रद्द केल्याने खडसे आक्रमक झाले आहे. हा एकनाथ खडसेंना विरोध आहे की, जळगाव की खान्देशला विरोध आहे. पडद्यामागून राजकारण कोण करतेय याचा शोध मी घेतोय . पण सरकारच्या जबाबदार मंत्र्यांनी याबाबत खुलासा करावा . उत्तर महाराष्ट्रावर अन्याय केला जातोय का याचे उत्तर मंत्र्यांनी द्यावे. जाणीवपूर्वक अन्याय केला जातोय का ? सर्वीकडचे प्रकल्प होतोय असताना खान्देशचे प्रकल्प रद्द का?,  असा खडा  सवाल  खडसेंनी सरकारला  केला.

 

खान्देशातील कृषी अवजार संशोधन केंद्र, लिंबूवर्गीय संशोधन केंद्र, कृषी महाविद्यालय, पशू वैद्यकीय महाविद्यालय हे मंजूर प्रकल्प नामंजूर का केले ?  प्रकल्पांसाठी जमीन संपादन पूर्ण झाले असतानाही प्रकल्प रद्द का केले असा सरकारला खड्बोल सुनावले आहेत.

 

COMMENTS