गोरखपूर बालमृत्यू प्रकरण: ‘अशा दुर्घटना होतच असतात’, अमित शाहांचं बेजबाबदार वक्तव्य

गोरखपूर बालमृत्यू प्रकरण: ‘अशा दुर्घटना होतच असतात’, अमित शाहांचं बेजबाबदार वक्तव्य

नवी दिल्ली – देशभरातून उत्तर प्रदेशातील गोरखपूर बालमृत्यूकांडवरुन रोष व्यक्त होत असताना भाजपाध्यक्ष अमित शाहा यांनी अत्यंत बेजबाबदार वक्तव्य केलं आहे . ‘इतक्या मोठ्या देशात खूप सा-या दुर्घटना झाल्या आहेत. पहिल्यांदा अशी दुर्घटना झालेली नाही’, असं धक्कादायक वक्तव्य अमित शाहा यांनी केलं आहे.

उत्तर प्रदेशातील बाबा राघवदास मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा थांबल्याने झालेल्या या दुर्घटनेत 70 हून अधिक बालकांचा मृत्यू झाला आहे. पत्रकारांशी बोलत असताना अमित शाहा यांनी हे वक्तव्य केलं.

‘राजीनामा मागणे काँग्रेसचं काम आहे. देशात याआधीही एवढ्या मोठ्या दुर्घटना झाल्या आहेत. ही काही पहिलीच वेळ नाही’, असं अमित शाहा बोलले आहेत. दरम्यान घटनेची दखल घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

 

COMMENTS