चिंता नसावी…. राज्यात फटाकेबंदी होणार नाही – रामदास कदम

चिंता नसावी…. राज्यात फटाकेबंदी होणार नाही – रामदास कदम

मुंबई –  शिवसेना खासदार संजय राऊत आणि राज ठाकरे यांनी चिंता करू नये, हिंदूंच्या सणांची काळजी या रामदास कदमलाही आहे. बाळासाहेबांनी मलाही हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. कृपया आपण लोकांमध्ये संभ्रम पसरवू नये, महाराष्ट्रात फटाकेबंदी होणार नाही, असे वक्तव्य कदम यांनी केले. 

दिल्लीच्या धर्तीवर राज्यातही फटाके बंदी करून पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्यात आली पाहिजे, यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी काल प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यक्रमात म्हटले होते.  यावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी जोरदार आक्षेप घेतला होता. फटाके उद्योगावर अवलंबून असणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. त्यांना बेरोजगार करता येणार नाही. तसेच हिंदूंच्या सणांवर आता आणखी निर्बंध खपवून घेतले जाणार नाहीत, असे राऊत यांनी म्हटले होते. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही फटाकेबंदीला तीव्र विरोध केला होता.

COMMENTS