चॅम्पियन ट्रॉफीतील भारताच्या पराभवाची चौकशी करा, रामदास आठवलेंची मागणी

चॅम्पियन ट्रॉफीतील भारताच्या पराभवाची चौकशी करा, रामदास आठवलेंची मागणी

चॅम्पियन ट्राफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानाने भारताचा दारूण पराभव केला आणि विजेतेपदावर नाव कोरले त्याला आता पंधराहून अधिक दिवस उलटून गेले . मात्र, आता केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भारताच्या पराभवाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

जिल्हास्तरावरील अधिकाऱयांसोबत बैठकीसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले गुजरातमध्ये आले होते. ‘चॉम्पियन्स ट्रॉफीत भारताचा पाकिस्तानाकडून पराभाव झाला. मात्र इतकी मजबूत टीम पाकिस्तानासारख्या संघाकडून 180 धावांनी कशी पराभूत होऊ शकते?, असा सवाल रामदास आठलेंनी उपस्थित केला आणि भारताच्या पराभावाची चौकशी करण्याची मागणी केली. जगाचे लक्ष लागलेल्या चॉपिम्यनस टाफीवर पाकिस्तानाने आपले नाव कोरले. अंति फेरीत पाकिस्तानाने टीम इंडियाचा तब्बल 180 धावांनी धुव्वा उडवला. पाकिस्तानला पहिल्यांदाच चॉम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद मिळाले.

 

COMMENTS