…तर अनेक अदृश्य ‘हात’ सरकार वाचवतील – मुख्यमंत्री

…तर अनेक अदृश्य ‘हात’ सरकार वाचवतील – मुख्यमंत्री

राज्यातील सरकारला कोणताही धोका नाही. जर धोक्याची परिस्थिती आलीच तर अनेक अदृश्य ‘हात’ सरकार वाचवण्यासाठी पुढे येणार आहेत, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. राज्यात कोणताही राजकीय भूकंप येणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच या एकाच विधानामुळे त्यांनी काँग्रेस व शिवसेनेेला इशारा दिल्याचे मानले जात आहे.  एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केले.
राज्यातील युती सरकारमधील भाजप-शिवसेना दोन्ही पक्ष एकमेकांना पाण्यात पाहत आहेत. अनेक मुद्द्यांवरून एकमेकांवर टीका करण्याची संधी त्यांचे नेते सोडत नाहीत. गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना सत्तेत राहणार की नाही याबाबत चर्चा सुरु होत्या. यातच राज्यात भूकंप येईल, असे शिवसेनेकडून सांगितले जात होते. यावर ते म्हणाले, जर शिवसेनेने साथ सोडली तर अनेक अदृश्य हात सरकार वाचवण्यासाठी आहेत. भाजप आणि शिवसेनेमध्ये कधीकधी कुरबुरी होत असतात. मात्र, शिवसेनेसोबत पाच वर्ष गुण्यागोविंदाने सरकार चालवू, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

 

 

 

COMMENTS