विखे पाटीलानंतर काँग्रेसचा “हा” आमदारही म्हणतो काँग्रेस सरकारने कामेच केली नाहीत !

विखे पाटीलानंतर काँग्रेसचा “हा” आमदारही म्हणतो काँग्रेस सरकारने कामेच केली नाहीत !

मुंबई – काँग्रेस आघाडीच्या सरकारपेक्षा सध्याचे सरकार चांगले आणि काँग्रेसच्या कार्यकाळात लोकांची कामे झाली नाहीत असं जाहीर वक्तव्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी चक्क मुख्यमंत्र्यांसमोर एका जाहीर सभेत केलं होतं. त्यानंतर त्यावरून विखे पाटील यांनी काही स्पष्टीकरण दिलं असलं तरी ते भाजपमध्ये जाणार याचा संशय काही कमी झालेला नाही. आता अगदी तसंच वक्तव्य काँगेसचे मुंबईतील आमदार कालिदास कोळंबकर यांनी केलं आहे. गेली पंधरा वर्ष बीडीडी चाळीचा प्रश्न मांडत होतो. पण प्रश्न सुटला नाही. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रश्न सोडवला या शब्दात कोळंबकर यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं. त्यामुळे आता कोळंबकरांच्या भाजप प्रवेशालाही जोर आलाय. नारायण राणे यांच्यासोबत कोळंबकरही भाजपमध्ये जाणार अशा चर्चा रुंगु लागल्या आहेत.

COMMENTS