दिल्लीतील पराभवास अरविंद केजरीवाल जबाबदार –  अण्णा हजारे

दिल्लीतील पराभवास अरविंद केजरीवाल जबाबदार – अण्णा हजारे

अहमदनगर – दिल्ली महापलिकांच्या निवडणुक निकालानंतर अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर सडकून टीका केलीय. अरविंद केजरीवाल हेच पराभवास जबाबदार आहे. त्यांनी जनतेला दिलेली आश्वासन पाळली नाही. दिल्लीमध्ये प्रगती करायच सोडुन केजरीवाल यांनी इतर राज्यांतील निवडणुकांत लक्ष दिल्याने त्यांचा निवडणुकीत पराभव झालांय.

 

दिल्लीतील तिन्ही महानगरपालिकांच्या निवडणुकीत भाजप, आप आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांत काटे की टक्कर होती. तिन्ही पक्षांसाठी ही महत्वाची आणि अस्तित्वाची लढाई होती. पण या लढाईत भाजप अग्रेसर दिसल्याचं स्पष्ट होत आहे. भाजपला 180 जागांवर विजय मिळवला आहे तर काँग्रेसला मागे टाकत आप 45 जागांवर विजयी आहे. तर काँग्रेसने फक्त 35 जागांवर विजय मिळविला आहे. तर इतर 10 उमेदवार विजयी झाले आहेत.

COMMENTS