“नारायण राणेंची साथ कधीच सोडणार नाही”

“नारायण राणेंची साथ कधीच सोडणार नाही”

मुंबई – ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्यासोबत अनेक आमदार शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आले. मात्र काळाच्या ओघात बहुतके आमदार हे राणेंपासून दूर गेले. कोणी पक्ष बदलला, तर कोणी काँग्रेसमध्ये आपला गट बदलला. तेंव्हाचे काही मोजकेच नेते आणि आमदार आता राणेंसोबत आहेत. त्यामध्ये मुंबईतील आमदार कालिदास कोळंबकर यांचा समावेश आहे. अजूनही ते राणेंच्या आजही जवळ असल्याचं दिसून येतंय. बीडीडी चाळीच्या प्रश्नासंदर्भात त्यांनी काल पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर आपण राणेंची साथ कधी सोडली नाही आणि यापुढेही सोडणार नाही असं स्पष्ट केलं. मैत्री कशी करायची हे मी राजकारणात उदाहरण घालून दिले आहे असंही ते म्हणाले. ते एवढ्चायवर थांबले नाहीत, तर भविष्यातली राजकीय वाटचालीबाबत आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ असं सूचक वक्तव्यही केलं. राणेंच्या भाजप प्रवेशाची सध्या चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य महत्वाचं आहे.

COMMENTS