नेवाळी शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण, अनेक शेतकरी जखमी, पोलिसांचा हवेत गोळीबार

नेवाळी शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण, अनेक शेतकरी जखमी, पोलिसांचा हवेत गोळीबार

कल्याण – नेवाळी विमानतळाच्या जमीन अधिग्रहणावरुन सुरू झालेल्या शेतकरी आंदोलानाला हिंसक वळण लागलं आहे. शेतक-यांनी कल्याण मलंगगड रस्ता रोखल्यानंतर पोलिसांनी तिथल्या शेतक-यांवर लाठीमार केला. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतक-यांनी पोलिसांवर दगडफेक केली त्यात पोलिसांच्या काही गाड्या फुटल्या आहेत. त्यानंतर पोलिसांनी हवेत गोळीबार केला. नेवाळी विमानतळासाठी सरकारने जबरदस्तीने जमीनी संपादित केल्याचा आरोप करत परिसरातील शेतक-यांनी त्याविरोधात तीव्र आंदोलन सुरू केले आहे.  आपल्या मालकीच्या जमीनीवर पेरणी करण्यास सरकारने बंदी घातल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यांनी टायर जाळून मलंगगडाकडे जाणारी वाहतूक रोखली आहे.

COMMENTS